बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी, बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खास करुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचे गाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोने किती आवडते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र, ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठाऊक आहे. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेल्या बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. मात्र, १९७६ साली आलेल्या 'चलते-चलते' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र वप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढे सोने घालण्यामागचे कारण सांगितले. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की, सोने माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोने घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असे बप्पीदांनी सांगितले. दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोने असल्याचे सांगण्यात येते. बप्पीदा यांनी आजवर 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरू', 'घायल', 'रंगबाज' या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.
Sunday, November 29, 2020
बप्पीदा एवढं सोनं गळ्यात का घालतात?
बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याचवेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी, बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे बप्पी लहरी दोन गोष्टींसाठी खास करुन ओळखले जातात. त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याचे गाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सोन्यावरील प्रेम. बप्पीदांना सोने किती आवडते हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असतात. मात्र, ते एवढे दागिने का घालतात हे फार कमी जणांना ठाऊक आहे. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये जन्म झालेल्या बप्पीदांनी वयाच्या २१ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. मात्र, १९७६ साली आलेल्या 'चलते-चलते' या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र वप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली. विशेष म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांचीही चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी एवढे सोने घालण्यामागचे कारण सांगितले. तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की, सोने माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोने घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असे बप्पीदांनी सांगितले. दरम्यान, बप्पीदांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षादेखील अधिक सोने असल्याचे सांगण्यात येते. बप्पीदा यांनी आजवर 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरू', 'घायल', 'रंगबाज' या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास
बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...

-
वहिदा रहमान या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली. नंतर गुरू दत्त यांनी त्...
-
शर्मिला टागोर जेव्हा तेरा वर्षांची होती तेव्हा तिने सत्यजीत राय यांच्या 'अपूर संसार' (1959) या चित्रपटात काम करून आंतरराष्ट्रीय ...
-
सारांश: दीपिका पादुकोण आपल्या वडिलांची, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची बायोपिक निर्मिती करणार आहे. सध्या ती 'कल्की २८९८...
No comments:
Post a Comment