Saturday, March 25, 2023

कालचा किशन कन्हैया अक्षय कुमार, आजचा 'मिस्टर क्लीन


'सौगंध’ (1991) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा 'खिलाडी कुमार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. खऱ्या अर्थाने अक्षय कुमारची ओळख 'खिलाडियों का खिलाडी' (1996) या चित्रपटाद्वारे  झाली. अक्षय कुमार त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिला. आयेशा जुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा आणि रेखा यांसारख्या किती तरी बॉलीवूड सौंदर्यवतींचे नाव त्याच्याशी जोडले गेले. अक्षय कुमारचे प्रियंका चोप्रासोबतचे अफेअर सर्वाधिक चर्चेत होते. 'अंदाज' (2003) मध्ये काम करताना तो देसी गर्ल प्रियांकावर क्रश झाला होता. असेच काहीसे अक्षयच्या बाबतीत प्रियांकाच्या बाबतीत घडले. त्यानंतर 'ऐतराज' (2004) मध्ये एकत्र काम करताना अक्षय कुमार आणि प्रियांकाला पुन्हा एकदा जवळ येण्याची संधी मिळाली. 'ऐतराज' (2004) दरम्यान दोघांमधील जवळीक सतत वाढत गेली. या चित्रपटातील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट सुपरहिट ठरला. अक्षय जेव्हा प्रियांकाच्या आधी रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्या प्रेमात पडला होता, तेव्हा त्याचे लग्न झाले नव्हते. पण प्रियंकासोबतचे प्रेम बहरत असताना त्याची पत्नी ट्विंकल ही अक्षयच्या मार्गात सर्वात मोठी अडचण ठरत होती. प्रियंकासोबत अक्षयच्या अफेअरची बातमी ट्विंकलच्या कानापर्यंत पोहोचली तेव्हा तिने अक्षयला अल्टिमेटम दिला की, त्याने प्रियंकासोबत पुन्हा कुठलाही चित्रपट करायचा नाही. झालं ही काहीसं असंच! 'ऐतराज' (2004) च्या यशानंतर ही जोडी फक्त 'वक्त: रेस अगेन्स्ट टाइम' (2005)  या एकाच चित्रपटात एकत्र दिसली होती आणि हा चित्रपट या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला. अक्षयची आयशा झुल्का, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका यांच्याशी असलेली जवळीक समजण्यासारखी आहे. मात्र 'खिलाडियों का खिलाडी' (1996) मध्ये काम करताना जडला होता 13 वर्षांनी मोठी असलेल्या रेखाचा जीव अक्षय कुमारवर , तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 'खिलाडियों का खिलाडी'मध्ये अक्षयसोबत रेखाचा उत्कट रोमँटिक सीन चित्रित करताना रेखा आणि अक्षय कुमार जवळ आल्याचे सांगितले जाते. त्या काळात अक्षय कुमार चित्रपटात काम करणारी मुख्य अभिनेत्री रवीनाला डेट करत होता. त्यांच्यात अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या, पण रेखा ज्याप्रकारे सेटवर अक्षय कुमारसोबत मोकळेपणाने वेळ घालवत होती, आणि त्याच्यासाठी घरून जेवण बनवून  आणायची, तेव्हा रवीनाची परिस्थिती मोठी असह्य होत होती! रेखा आणि अक्षय यांच्यातील जवळीकीमुळे अक्षय कुमार आणि रवीना टंडन अखेर विभक्त झाले. एक मात्र खरे की, ट्विंकलसोबतच्या लग्नाआधी अक्षयची प्रतिमा 'किशन कन्हैया'ची होती, पण लग्नानंतर तो इतका सुधारला आहे की त्याला 'मिस्टर क्लीन' म्हटले जाऊ लागले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

Sunday, March 19, 2023

अभिनेता शाहिद कपूरच्या कारकिर्दीची वीस वर्षे


शाहीद कपूरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज त्याला बॉलिवूड मध्ये येऊन वीस वर्षे झाली. बॅकग्रआऊंड डान्सर म्हणूनही त्याने सुरुवातीच्या काळात काम केलं. २००३मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क विश्क चित्रपटामधून त्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्याने विवाह, जब वी मेट, कमीने, उडता पंजाब, उडता पंजाब, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. 

शाहिद कपूरचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 रोजी दिल्लीत झाला. वडिलांचे नाव पंकज कपूर आहेत, जे प्रसिद्ध चित्रपट अभिनेता निर्माता आहेत.त्यांच्या आईचे नाव नीलिमा अझीम आहे. त्याला 3 भावंडे आहेत - सना कपूर, ईशान खट्टर आणि रुहान कपूर. ईशान खट्टरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहिद कपूर हा आज बॉलीवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे, परंतु त्याने यापूर्वी टीव्ही जाहिरातींमध्ये आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केले आहे. 'इश्क विश्क' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या शाहिदने पहिल्याच चित्रपटातून  प्रेक्षकांची मने जिंकली. त्या काळात विशेषतः मुलींमध्ये रोमँटिक हिरोंची खूप क्रेझ दिसून येत होती. 

या चित्रपटासाठी शाहिदला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला होता.यानंतर 2006 मध्ये सूरज बडजात्याचा 'विवाह' हा चित्रपट खूप गाजला. त्याचवेळी 2007 मध्ये आलेला इम्तियाज अलीचा 'जब वी मेट' हा शाहिदच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील यादगार चित्रपटांमधला एक गणला जातो. 2009 मध्ये, शाहिदला विशाल भारद्वाजच्या 'कमिने' या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली. यादरम्यान त्यांनी दिल बोले हडिप्पा, चांस पे डान्स, पाठशाला, बदमाश कंपनी, मिलेंगे मिलेंगे, मौसम आणि तेरी मेरी कहानी या चित्रपटांमध्ये काम केले, परंतु यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही.  2013 साली शाहिदचे 'फटा पोस्टर निखला हिरो ' आणि 'आर राजकुमार'  हे चित्रपट प्रदर्शित झाले.   प्रभुदेवा दिग्दर्शित आर राजकुमारला तिकीट खिडकीवर सरासरी यश मिळाले. या चित्रपटात शाहिदने आपल्या जबरदस्त अॅक्शन सीन्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. 

शाहिदचा 'हैदर' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपटातील दमदार अभिनयासाठी शाहिद कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 'पद्मावत' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले होते. कबीर सिंग हा शाहिदचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. शाहिदची करीना कपूरसोबतची जोडीही छान जमली होती.  या दोघांच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. शाहिद आणि करिनाच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत राहिल्या. मात्र, करिनाने सैफ अली खानशी लग्न केले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले. विशेष म्हणजे मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे, पण दोघांचे बाँडिंग पाहून तुम्हीही म्हणाल की, दोघांमधील वयाचे हे अंतर फक्त सांगायला आहे. मीरा आणि शाहिदचे 2015 साली लग्न झाले होते. दोघांनी अरेंज मॅरेज केले होते.  मीरा आणि शाहिदचे काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्ये एका खाजगी समारंभात लग्न झाले. दोघांना दोन लाडकी मुलं आहेत, ज्यांची नावे मीशा कपूर आणि झैन कपूर आहेत. अलीकडेच त्याने 'फर्जीं ' द्वारा वेबमालिकेद्वारा छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

मेहंदी व दो या नावावरून आतापर्यंत किती चित्रपट निर्माण झाले आहेत? त्यातील प्रमुख कलाकार कोण?


प्रश्न - मेहंदी व दो या नावावरून आतापर्यंत किती चित्रपट निर्माण झाले आहेत? त्यातील प्रमुख कलाकार कोण?

उत्तर-  मेहंदी या नावाचे तीन चित्रपट आतापर्यंत निर्माण झाले आहेत. १९४७ साली पहिला मेहन्दी निर्माण झाला होता. नरगिस, बेगमपारा (माशूक मधील अयूबखान या नायकाची आई) करणदीवाण, मुराद, घोरी, जिल्लोबाई, अन्वरी, जानी बाबू, बेबी श्यामा, प्रतिमादेवी.यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. १९५८ साली दुसरा मेहन्दी निर्माण झाला होता. व तो उमराव जानच्या जीवनावर आधारलेला होता. शांताराम बापूंची भूतपूर्व पत्नी व राजश्रीची आई जयश्री हिने या चित्रपटात उमराव जानची भूमिका केली होती. तिच्याबरोबर अजित, वीणा, ललिता पवार, बालम, मिर्झा, मुश्रफ, कुमार, मुमताज बेगम, कृष्णकांत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. 1963 साली तिसरा 'मेहंदी' निर्माण झाला होता. विनोद मेहरा, रंजिता, मदनपुरी, उषा किरण, राज बब्बर यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. मेहंदी या शब्दांपासून सुरू झालेले इतर चित्रपट गुजराती भाषेत अधिक निर्माण झाले होते.

दो या शब्दापासून सुरू झालेले चित्रपट पुढीलप्रमाणे- दो आंखे (1974- कलाकार- अशोक कुमार, रेखा, विश्वजीत, देवमुखर्जी, नाज, मानकी दास, आय एस जौहर(, दो चट्टाने (1974 कलाकार- राकेश पांडे, विक्रम, आशा सचदेव, अरुणा इरानी, जोगेंद्र, ओमप्रकाश), दो नंबर के अमीर (1974 आशा सचदेव, 

सुजीतकुमार, रुपेशकुमार, जोहर) दो आदमी (१९६०, जयराज, शशिकला, जींवनकला, कुमुद त्रिपाठी) दो दोस्त (१९६०, चित्रा, कामरान, हेलन) दो अन्जाने (१९७४, अमिताभ, रेखा, प्रेम चोप्रा, प्रदीपकुमार, उत्पल दत्त, ललिता पवार, मिथुन चक्रवर्ती) दो खिलाडी (१९७६ विनोद मेहरा, जाहीदा, शशीपुरी, अनिता गुहा) दो लडकीयां (१९७६ संजीवकुमार, मालासिन्हा, मेहमूद, सुलोचना) दो आंखे बारह हाथ (१९५७ व्ही शांताराम, संध्या, बाबूराव पेंढारकर, उल्हास, केशवराव दाते, बी. एम. व्यास) दो रोटी (१९५७ बलराज साहनी, निरुपा रॉय, जॉनी वॉकर, मेहमूद, कन्हैयालाल) दो और दो पांच (१९८० अमिताभ, शशी कपूर, हेमा' मालिनी, परवीन बाबी) दो प्रेमी (१९८२ ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, गीता बहल, जोहर) दो शत्रू (१९८० शत्रुघ्न सिन्हा, शर्मिला ठागोर, सुजीतकुमार) दो बच्चे दस हाथ (१९७२ सुभाष घई, अनुपमा, प्रेमनाथ, रमेश देव) दो चोर (१९५१ धर्मेन्द्र, तनुजा, के. एन. सिंग, शोभना  समर्थ) दो गज जमिन के नीचे (1972 शत्रुघ्न  सिन्हा, विनोद खन्ना ) दो बहन  (1966 आशा पारेख, मनोजकुमार, सिप्पी, प्राण) दो दिलों की दास्तान (1966 प्रदीप कुमार, वैजयंती माला, शशिकला), दो मतवाले (१९६६ रंधवा, मलिका) : दो बदसाष (1932 घोरी, दिक्षिता,शांता). दो बहाद्वर (१९५३ बलराज साहनी, निरूपा रॉय) दों बाते ( 1949 रमोला नारंग), दो भाई ( 1947 कामिनी कौशल, राजन एक्सर, उल्हास), दो दिल (१९४७  शमिम, महिपाल, अनिता शर्मा) दो भाई ( 1968 अशोक कुमार शेख मुख्तार, जितेन्द्र, माला सिन्हा), दो रास्ते ( 1969 राजेश खन्ना, मुमताज,बलराज साहनी, बिंदू,वीणा, प्रेम चोप्रा), दो भाई (1961 शकीला,अभी भट्टाचार्य, अनिल कफूर) दो बुंद पानी (१९७९ सिम्मी, जलाल आगा, किरण कुमार) दो चेहरे (1977 अरुणा इराणी, वीरेंद्र, पद्मा खन्ना ), दो दिलवाले (1977 सोम दत्ता, सरिता सेन), दो शोले (1977 नरेंद्र गौरी वर्मा) , दो दिल (1965 राजश्री, विश्वजीत, मेहमूद), दो दिल दिवाने (1981 कमल हसन, रती अग्निहोत्री), दो दिलों की दास्तान (1985 संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे, अरुण गोविल), दो दिशांए (1982 धमेन्द्र, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा), दो दिवाने (1936 मोतीलाल, शोभना समर्थ, याकूब), दो दुनी चार ( 1968 किशोर कुमार, तनुजा, अजित सेन), दो कलियां ( 1968 विश्वजीत, मालासिंहा, बेबी सोनिया), दो दुल्हे ( 1955 सज्जन, श्यामा), दो दुश्मन (1965 दारासिंग, अजित, मुमताज), दो घडी की मौज (1935 सुलोचना, रुबी मायर्स, डी बिलमोरिया), दो गुलाब ( 1983 कुणाल गोस्वामी, मीनाक्षी शेषाद्री), दो गुंडे (१९५९ राजकपूर, मधुबाला, शेख मुख्तार, सुलोचना) दो बहने (१९५९ राजेन्द्र कुमार, श्यामा) दो हवालदार (१९७९ असरानी, झरीना वहाब) दो शिकारी (१९७९ विश्वजीत, रेखा) दो जासूस (१९७५ राज कपूर, राजेंद्र कुमार, शैलेंद्र सिंह, भावना भट्ट) दो झुठे (१९७५ विनोद मेहरा, मौसमी चटर्जी) दो ठग (१९७५ हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा) दो कलियां (१९४९ राजन, शालिनी), दो लडके दोनो कडके (१९७९ अमोल पालेकर, मौसमी चटर्जी) दो मुसाफिर (१९७८ अशोककुमार, शशी कपूर, रेखा) दो मस्ताने (१९५८ मोतीलाल, शेख मुख्तार, बेगम पारा) दो फ़ूल (१९५८ मा. रोमी, बेबी नाज) दो फूल (१९७३ अशोककुमार, मेहमूद, अरुणा ईराणी, विनोद मेहरा) दो राहे' (१९५३ नलिनी जयवंत शेखर) दो राहे (१९७१ राधा सलूजा, अनिल धवन, रुपेश कुमार) दो सितारे (१९५१ देव आनंद, सुरेय्या, प्रेमनाथ) दो उस्ताद (१९८२ शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय).


Saturday, March 18, 2023

'या' बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये 36 चा आकडा आहे, त्यांना एकमेकांचा चेहरा पाहणे देखील पसंद नाही


मनोरंजनाच्या ग्लॅमरस दुनियेत अभिनेत्रींमध्ये सन्मान आणि स्टारडमची लढाई अनेकदा पाहायला मिळते. अनेकदा अनेक अभिनेत्रींमध्ये कॅटफाईटही होते. या अभिनेत्रींमधली काही भांडणं एवढं मोठं रूप धारण करतात की, दुभंगलेल्या नजरेनेही ते एकमेकांना पसंत करत नाहीत. फिल्म इंडस्ट्रीमध्येही काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा आकडा 36 आहे. चला जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल, ज्यांना एकमेकांना पाहायलाही आवडत नाही. 

दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ

या यादीत दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघी बॉलिवूडच्या टॉप हॉट अभिनेत्रींपैकी एक आहेत. फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही दोघेही एकमेकांना टक्कर देतात, पण त्यांच्यातील युद्ध केवळ स्टारडमपर्यंतच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही सुरू आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा दीपिका आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दीपिका कतरिनाच्या जवळ आल्यानंतर अभिनेत्याने दीपिकासोबत ब्रेकअप केले होते. तेव्हापासून दीपिका आणि कतरिनाचे नाते बिघडले, जे आजतागायत मिटलेले नाही. 

ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी

ऐश्वर्या राय बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील भांडणही खूप जुने आहे. दोघी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.  त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की, 'चलते चलते' या चित्रपटात ऐश्वर्याला पहिल्यांदा शाहरुख खानसोबत नायिकेच्या भूमिकेत कास्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी ऐश्वर्या सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि सलमान सेटवर खूप गोंधळ घालायचा. यानंतर निर्मात्यांनी ऐश्वर्याला सोडून राणी मुखर्जीकडे वळले आणि तिला चित्रपटात नायिका म्हणून कास्ट केले.  यामुळे ऐश्वर्या राणीवर चिडली होती. 

प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर

बॉलीवूडच्या दोन सुपर हॉट अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्यातही 36 चा आकडा आहे. 'ऐतराज' चित्रपटात निगेटिव्ह भूमिका साकारूनही प्रियांका चोप्राचेच कौतुक होत असताना आणि करीनाला कमी लेखण्यात आल्याने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. 'कॉफी विथ करण' मधील प्रियांकाच्या उच्चारावर करीनाने टिप्पणी केली आणि तिला खोटे म्हटले तेव्हा हे मतभेद मोठ्या भांडणात बदलले. 

रेखा आणि जया बच्चन

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि जया बच्चन यांच्यातील युध्दाची जगाला कल्पना आहे. दोघांमधील युद्धाचे कारणही सर्वश्रुत आहे. जया आणि रेखाच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण बनले बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन. अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा आजवर इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.  त्यामुळे रेखा आणि जया यांच्यातील अंतर वाढत गेले, जे आजही कायम आहे.



Friday, March 17, 2023

नव्या चित्रपटात जुनी गाणी, नव्या संगीतात दम नाही ?


रहे ना रहे हम, महका करेंगे, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्‍यों डरता है दिलं ... सारखी 50 ते 60 वर्षांपूर्वी रचलेली असंख्य गाणी आजही लोकांना रोमांचित करतात. गुणगुणायला लावतात. आजही जुनी गाणी हृदयाला भिडतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकिकडे एआर रहमानच्या संगीतात तयार झालेल्या 'जय हो...' नंतर पुन्हा एकदा साऊथ चित्रपट 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्करने सन्मानित केले आहे. तर दुसरीकडे आपल्या बॉलीवूडच्या आगामी नवीन चित्रपटांमध्ये जुनी गाणी नव्या ढंगात आणि मोठ्या थाटात सादर केली जात आहेत. अशा परिस्थितीत मूळ गाणी सादर करण्यासाठी बॉलीवूड प्रयत्न का करत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 

जुनी गाणी रिमिक्स करून नवीन चित्रपटात वापरणे ही तशी खूप जुनी गोष्ट आहे पण आजकाल नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यामध्ये जुनी गाणी नव्या चित्रपटात त्याच शैलीत म्हणजे जशीच्या तशी सादर केली जात आहेत. उदाहरणार्थ, सनी देओल अभिनीत आणि दिग्दर्शित 'चूप' या चित्रपटात, 'जाने क्या तूने कंही जाने क्या मैं ने सुनी' आणि 'ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है...' सारख्या जुन्या 'कागज के फूल' चित्रपटातील गाणी कोणत्याही बदलाशिवाय जशीच्या तशी वापरली गेली आहेत. त्याचप्रमाणे अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटातील 'मैं खिलाडी तू अनारी' हे गाणेही त्याच जुन्या शैलीत सादर करण्यात आले आहे. अजय देवगणच्या आगामी 'भोला' या चित्रपटातील 'आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मरने का इरादा है' या जुन्या गाण्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, वृत्तानुसार, अमिताभ बच्चन आणि गोविंदा स्टारर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' चे शीर्षक गीत देखील अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे. चित्रपटातील जुनी गाणी कोणताही बदल न करता ठेवण्यामागे काही ना काही कारणंही मांडण्यात आली आहेत. ती कधी कथेच्या मागणीनुसार ठेवण्यात आली आहेत. तर  कधी चित्रपटाच्या कथेशी संबंधित  जुने गाणेही लावले जाते.जुन्या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये जी ताकद आढळते ती नवीन गाण्यांमध्ये नसण्याची अनेक कारणे आहेत.  जसं की आधीच्या गाण्यांचे स्वर खूप चांगले होते पण व्हिडीओ तितकासा चांगला नव्हता. त्यामुळे पूर्वीची गाणी बघण्यापेक्षा ऐकायला चांगली वाटतात. आजकालच्या गाण्यांमध्ये व्हिडीओ चांगला आहे पण गायन तितकेसे शक्तिशाली नाही. ना गाण्याचे बोल शैलीत आहेत ना संगीत दमदार आहे. त्यामुळे 100 पैकी फक्त 10 गाणीच लोकप्रिय होतात. 

बाकीची गाणी कधी आली किंवा गेली हे माहीतही होत नाही. पूर्वीचे संगीत दिग्दर्शक गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी स्टुडिओतील सर्व वादकांना बोलावत आणि प्रत्येक वाद्य स्वतंत्रपणे वाजवलं जाई। जसे की तबला, सारंगी, हार्मोनियम, पियानो, ढोलकी इ. आजचे संगीत दिग्दर्शक सिंथेसायझर वापरतात, ज्यात आधीच सर्व संगीत सामावलेले असते, ज्यामुळे वास्तविक संगीताचा अभाव दिसून येतो. पूर्वीची गाणी गोड आवाजातील  आणि मृदू संगीताच्या अंतर्गत भावनांनी भरलेली होती जी केवळ हृदयापर्यंतच पोहोचत नव्हती तर सामान्य श्रोत्यांनाही ते गाणे सोपे वाटत होते. असे नाही की आजचे गायक सक्षम नाहीत किंवा संगीत दिग्दर्शक आणि गीतकारांमध्ये काही चांगले घडवून आणण्याची ताकद नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे आज विशेषत: हिंदी चित्रपटांमध्ये निर्माते किंवा संगीतकार आपली कला दाखवण्यासाठी फारशी मेहनत घेताना दिसत नाहीत. पूर्वी गाण्याचे बोल लिहून त्यानुसार ट्यून बनवली जात होती, पण आज आधी ट्यून बनवली जाते मग त्यात शब्द टाकले जातात. 

आजही श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, सोनू निगम, अभिजीत इत्यादी काही दिग्गज गायक आहेत. पण असे असूनही, पूर्वीच्या तुलनेत आजची गाणी फार कमी वेळ वाजली जातात. त्यामुळेच आता गायकांनी त्यांचे वैयक्तिक अल्बम बनवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून चित्रपटाच्या अपयशामुळे त्याच्या गाण्याचे आणि करिअरचे नुकसान त्याला सहन करावे लागणार नाही. संगीतकार-गायक हिमेश रेशमियाच्या मते, तो चित्रपटांपेक्षा त्याच्या अल्बमवर अधिक लक्ष केंद्रित करतो कारण त्याने संगीतबद्ध केलेल्या चित्रपटाच्या अपयशामुळे त्याच्या संगीत कारकिर्दीवर परिणाम होऊ नये असे त्याला वाटते.


Thursday, March 16, 2023

नवाजुद्दीनच्या आधीही अनेक कलाकारांनी चित्रपटात महिला भूमिका साकारल्या. यात काहींची वाहवा झाली, काहींना नाकारण्यात आलं


नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा अनुभवी अभिनेता आहे. अनेक दमदार भूमिका साकारून त्यांनी लोकांना आपले फॅन बनवले आहे. नवाजचा पुढचा चित्रपट 'हड्डी' आहे.  नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात त्याने महिलांचे कपडे घातले आहेत. यात तो 'हिजाड्या'ची भूमिका साकारत आहे. अशा प्रकारची भूमिका तो पहिल्यांदाच साकारत आहे. यापूर्वी सदाशिव अमरापूरकर यांनीदेखील हिजाड्याची, 'महारानी' ची भूमिका संजय दत्त आणि पूजा भट्ट चित्रपटात साकारली होती. सुमधूर गाणी आणि ऍक्शन थ्रिलर असल्याने हा चित्रपट गाजला होता. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सदाशिव अमरापूरकर यांनी महिलांचे कपडे घालून हिजाड्याची भूमिका साकारली असली तरी आपल्या बॉलिवूडमध्ये पुरुष कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. काही कलाकारांनी तात्पुरत्या स्वरूपात महिलांचे कपडे घातले आहेत तर काहींनी भूमिकेची मागणी होती म्हणून महिलांचे कपडे परिधान केले होते. मात्र काहींच्या स्त्री भूमिकांचे खरोखरच कौतुक झाले. तर काहींना नापसंदही केलं गेलं. बॉलिवूडमधील काही मोठ्या कलाकारांनी महिलांच्या 'गेटअप' मोह आवरला नाही. 'लावारीस' चित्रपटातील 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है' या गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्त्री वेशभूषा धारण केली होती. त्या गेटअपमधला अमिताभ चांगलाच पसंद केला गेला होता.  आजही अमिताभचे ते गाणे खूप लोकप्रिय आहे.

विशेष करून पुरुष कलाकारांनी महिलांचे कपडे परिधान करून कॉमेडीच अधिक केली आहे. अमिताभ बच्चन, गोविंदा, श्रेयस तळपदे, जावेद जाफरी अशा कालाकारांनी कॉमेडीच केली आहे. 'बाजी' चित्रपटातील  'डोले डोले दिल' या गाण्यात आमिर खान महिला गेटअपमध्ये दिसला होता.या चित्रपटाने फार काही व्यवसाय केला नाही पण आमिर खानचा तो 'लूक' लोकांना पसंद पडला. सैफ अली खान आणि राम कपूर आणि रितेश देशमुख यांनी 'हमशकल' चित्रपटात मुलींचा गेटअप घेतला होता. त्यांनी यात कॉमेडी केली होती. हा चित्रपट चालला नसला तरी त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. 'चाची 420' मध्ये कमल हसन याने महिलेची भूमिका साकारली होती. कमल हसन कोणतीही भूमिका फार विचारपूर्वक आणि प्रचंड मेहनतीने साकारतात. त्यांनी 'अप्पू राजा', 'मेयर साब', 'हिंदुस्थानी' अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या, गेटअपच्या भूमिका साकारल्या आहेत. इतक्या वैविध्य असलेल्या भूमिका क्वचितच कलाकाराने साकारल्या असतील. मात्र 'चाची 420' हा चित्रपट आणि पात्र कमल हासनच्या सर्वात यशस्वी पात्रांपैकी एक आहे. 

'जानेमन' चित्रपटात सलमान खानही मुलीच्या गेटअपमध्ये दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि लोकांना सलमानची भूमिका फारशी आवडली नाही. 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटातदेखील रितेश देशमुखने सोनिया नावाच्या महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील रितेशच्या भूमिकेचे लोकांनी चांगलेच कौतुक केले.'पेइंग गेस्ट' या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदेने स्त्रीची भूमिका साकारली होती. मात्र, या व्यक्तिरेखेत लोकांना विशेष दिसून आले नाही. चित्रपट प्लॉप ठरला. गोविंदाने 'आंटी नंबर वन' मधील स्त्री पात्र साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'आंटी नंबर 1' या चित्रपटात गोविंदाने आंटीची सुंदर भूमिका साकारली होती ते तुम्हाला आठवत असेलच.  गुलाबी लेहेंग्यापासून ते लाल साडीपर्यंत सर्व काही गोविंदाने परिधान केले आहे. हा चित्रपटही सुपरहिट ठरला आणि गोविंदालाही खूप पसंती मिळाली. आयुष्मान खुराना यानेदेखील 'ड्रीम गर्ल' या चित्रपटात एका महिलेची भूमिका साकारली होती. 

संजय दत्तने बॉलीवूडमध्ये अॅक्शन हिरोंच्या भूमिकेसह अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तोही 'मेरा फैसला' या चित्रपटात एका महिलेच्या भूमिकेत आला होता. ऋषी कपूर हा अतिशय देखणा हिरो. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण एक सुंदर नायिकाही बनू शकतो.  ऋषी कपूर यांनीही 'रफुचक्कर' या चित्रपटात  स्त्री पात्र साकारले आहेच पण गाण्यांवर डान्सदेखील  केला आहे.  अजय देवगण, आर्षद वारसी हेदेखील 'गोलमाल' चित्रपट काही काळ स्त्री वेशात वावरले. याचा अर्थ अँग्री यंग मॅन, दबंग, सिंगम वेशात पडद्यावर वावणाऱ्या पुरुष कलाकारांना स्त्री वेशाचाही मोह आवरला नाही.


Wednesday, March 15, 2023

रोहित शेट्टीचे 8 वर्षांत सलग 7 ब्लॉकबस्टर चित्रपट


'सूर्यवंशी', 'सिम्बा', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'सिंघम' आणि 'गोलमाल अगेन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीकडे सक्सेस मंत्रा आहे. रोहित हा प्रसिद्ध फाईट मास्टर एमबी शेट्टी यांचा मुलगा आहे. लोक त्यांना फायटर शेट्टी या नावानेही ओळखतात. रोहितचा जन्म 14 मार्च 1973 रोजीचा. रोहितने बालपणीच चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आपल्या वडिलांसारखे व्हायचे होते. तो 11 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर घर विकायची वेळ आली. आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती की, त्यांना घराचे भाडे देणेही अवघड झाले होते, त्यामुळे त्यांना आजीच्या घरी राहावे लागले. रोहितच्या आईने अंधेरी फिल्म हबमधील मत्राज स्टुडिओमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. रोहितने लहानपणी आदर, संपत्ती आणि प्रसिद्धी पाहिली होती, परंतु अचानक सर्वकाही संपले होते. ते फिल्म इंडस्ट्रीतील असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये कोणतेही कष्ट न करता काम मिळाले. असा गैरसमज आहे. त्यांना कधीकधी खाणे आणि काम करणे यापैकी एक निवडणे हा सर्वात कठीण निर्णय होता. आधी ते सांताक्रूझला राहत होतो, नंतर दहिसरला शिफ्ट झाले. तिथे ते त्यांच्या आजीसोबत राहत होते.

1991 मध्ये आर्थिक अडचणींमुळे रोहितला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वयाच्या 15 व्या वर्षी रोहितने कुकू कोहलीसोबत 'फूल और कांटे' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. एका मुलाखतीत रोहित म्हणाला- कोणत्याही मुलाने अभ्यास सोडून नोकरी करावी असे मला वाटत नाही. शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे, परंतु कधीकधी आपली परिस्थिती कठीण असते. जेव्हा जेव्हा मी '3 इडियट्स' किंवा 'रंग दे बसंती' सारखे चित्रपट पाहतो तेव्हा मला असे वाटते की, मी फारसा शिकलेलो नसल्याने असे चित्रपट कधीच करू शकणार नाही. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगण पदार्पण करत होता. या चित्रपटाच्या सेटवर रोहित आणि अजय देवगणची मैत्री झाली. अजय हा अॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या सेटवर रोहित प्रथमच वीरू देवगण यांना भेटला, ते चित्रपटाच्या स्टंट्सची कोरिओग्राफी करत असत.

अजय देवगणने 'दिल क्या करे' आणि 'राजू चाचा' या चित्रपटांद्वारे त्याच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली. यासोबत रोहित शेट्टी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. 'राजू चाचा' हा बिग बजेट चित्रपट होता, पण हा चित्रपट तिकीटबारीवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. यामुळे अजय देवगणला खूप त्रास सहन करावा लागला. अजय आणि रोहितला दोन वर्षे प्रोडक्शन हाऊस बंद करावे लागले. सर्व कर्ज परत केल्यानंतर त्यांनी 'जमीन'मध्ये एकत्र दिग्दर्शन केले.

2003 ते 2006 हा काळ दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीसाठी सर्वात वाईट काळ होता. रोहितने 'गोलमाल'च्या स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली. काम पूर्ण झाल्यानंतरही एकही अभिनेता चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता. कोणत्याही प्रोडक्शन हाऊसने रोहितसोबत करारही केला नाही. 2006 मध्ये 'गोलमाल' रिलीज झाल्यानंतर रोहितचे नशीब पालटले. चित्रपट निर्माते नीरज व्होरा यांनी रोहितला 'अफलातून' नावाचे नाटक सांगितले. रोहितला या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करायचे होते. त्यादरम्यान धिलिन मेहता यांच्या श्री अष्टविनायक सिने व्हिजन नावाच्या निर्मिती संस्थेने रोहित शेट्टी आणि इम्तियाज अली यांना करारबद्ध केले. 'गोलमाल' चित्रपटाच्या रिलीजने रोहितच्या नावावर कॉमेडी फ्रँचायझी जोडली. 80 च्या दशकानंतरचा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा मनमोहन देसाईंनंतरचा पहिला दिग्दर्शक आहे ज्याचे सलग सात चित्रपट हिट झाले. यामुळे रोहितला बॉक्स ऑफिसचा प्रेसिडेंट देखील म्हटले जाते. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी खालिद मुहम्मद डॉक्युमेंट्रीमध्ये रोहित शेट्टीची स्वतःच फिल्म स्कूल असल्याचे म्हटले होते. त्याच्यासारखा चित्रपट कोणी बनवू शकत नाही.

यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...