आज किशोर कुमार यांची 36 वी पुण्यतिथी आहे. 13 ऑक्टोबर 1987 रोजी संगीताच्या या तेजस्वी ताऱ्याने आपल्या सर्वांचा निरोप घेतला. मात्र त्यांनी गाण्यांचा मोठा खजिना रसिकांसाठी मागे सोडला आहे.किशोर दा हे मध्य प्रदेशातील खांडवा शहरातले होते. लहानपणापासून त्यांच्या कुटुंबाचा आणि शहराच्या वातावरणाचा त्यांच्यावर झालेला प्रभाव शेवटपर्यंत राहिला.लहानपणीही त्यांचा मोठा भाऊ अशोक कुमार (तत्कालीन सुपरस्टार) खांडव्याला आल्यावर मिळालेल्या प्रचंड आदराने आणि लहान असल्याने लाड कमी होत असल्याने ( दुर्लक्ष होत असल्याने) व्यथित व्हायचे. तथापि, अशोक कुमारला चित्रपटात खलनायकाने मारलेलेही त्यांना सहन व्हायचे नाही. तत्कालीन अॅक्शन हिरो शंकर त्यांना खूप आवडायचा. किशोर कुमार यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांच्या पात्राचे नाव किशोर किंवा शंकर असायचे. किशोर खूप निर्मळ आणि भोळ्या मनाचे होते. खांडवा आणि निमारच्या ग्रामीण संस्कृतीने आणि धुळरहित शुद्ध अशा संगोपनाने त्यांना आतूनही शुद्ध ठेवले होते.त्यांचा गावाकडील निरागसपणा शेवटपर्यंत अबाधित राहिला. धोका देणे, फसवणूक करणे , मतलबीपणा अशा गोष्टी त्यांना अजिबात आवडत नसत.
त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत बऱ्याच काही गोष्टी, घटना घडल्या. त्यांच्या मेहनतीच्या बदल्यात दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यांचा अनेकदा छळही झाला. त्यामुळे 'जशास तसे' यावर विश्वास ठेवणाऱ्या किशोर दा यांनी अशा लोकांशी कधीच मैत्री केली नाही, त्यांना भेटले नाहीत आणि अशांना मुलाखतही दिली नाही.सबब सांगून टाळत असत. ज्याने खरा किशोर आतून समजून घेतला त्यालाच ते भेटायचे किंवा भेट द्यायचे. मत्सर आणि स्वार्थी जगापासून ते दूर राहिले.कोणत्याही व्यसनापासून ते पूर्णपणे दूर होते, त्यामुळे ते पार्ट्यांमध्येही जात नसत. घरीच ते संगीत आणि हॉरर चित्रपट या त्यांच्या आवडत्या छंदांमध्ये गुंतून जात असत किंवा गोवर्धन, झटपट झटपट, जनार्दन, रघुनंदन, गंगाधर इत्यादी नावं असलेल्या त्यांच्या आवडत्या झाडांशी बोलत असत. त्यांचा अल्हडपणा, साधेपणा आणि संगीतप्रेमी किशोर कुमार रसिकांच्या कायम स्मरणात राहतील.
किशोर कुमार यांनी जवळपास 1500 चित्रपटांमध्ये गाणी गायली. आजही लोक त्यांची गाणी मोठ्या आवडीने ऐकतात.एक उत्तम गायक असण्यासोबतच, किशोर कुमार हे लेखक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक देखील होते. पण त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफचीही खूप चर्चा होत राहिली.किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात झाला होता.किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण त्याला ओळख मिळाली ती फक्त त्याच्या पडद्यावरील नाव किशोर कुमारने.किशोर कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मस्तीखोर व्यक्ती होते आणि ते प्रतिभेनेही समृद्ध होते.
भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनही गोंधळाने भरलेले होते. किशोर कुमार यांनी एकूण चार लग्ने केली होती. त्यांचा चौथा विवाह लीला चंद्रावरकर यांच्याशी झाला. किशोर कुमार हे त्यांची चौथी पत्नी लीला चंद्रावरकर यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. चौथ्या लग्नाच्या वेळी त्यांचे वय ५१ वर्षे होते. दोघांची भेट 'प्यार अजनबी है'च्या सेटवर झाली होती. त्यांचे पहिले लग्न रुमा घोष, दुसरे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला, तिसरे लग्न योगिता बाली आणि चौथे लग्न लीला चंद्रावरकर यांच्याशी झाले होते.किशोर कुमारपासून वेगळे झाल्यानंतर योगिता बालीने मिथुन चक्रवर्तीसोबत लग्न केले. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली






_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0.jpg)
.jpg)
.jpg)





_%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0.jpg)
